समाजाविषयी साहित्यिकाची भूमिका कोणतेही साहित्य हा समाजाचा आरसा असतो. त्यात समाजाचे चांगले वाईट प्रतिबिंब दिसत असते. साहित्यिक आपल्या साहित्यातून समाजासमोरील असलेल्या विविध आर्थिक, सामाजिक, धार्मिक, लैगींकभेद अशा प्रश्नांवर भाष्य करत असतो. नुसते आपल्या साहित्यातून समाजाचे मनोरंजन करणे एवढेच काम साहित्यिकाचे नसते तर त्याच्या साहित्यातून समाजाला योग्य अशी दिशा मिळणे हे देखील तेवढेच महत्वाचे असते. आपल्या लेखणीतून समाजामधील ज्वलंत प्रश्नावर आसूड ओढण्याचे काम साहित्यिकाने करणे गरजेचे असते. साहित्यिकाने कोणत्याही एका पक्षाची, धर्माशी, मताची, प्रवाहाची बाजू न घेता समाजात जे काही चांगले घडत आहे त्याच्या पुरस्कार करणे त्याला प्रोत्साहन देणे, त्याला बळ देणे व तसेच जे काही निरपेक्षपणे, तटस्थ भूमिकेतून करणे गरजेचे आहे तरच त्याच्या साहित्याला एक वजन प्राप्त होईल. साहित्यिकाने प्रस्थापितांचे लांगुलचालण न करता आपले विचार प्रखरपणे मांडणे गरजेचे आहे. साहित्यिकाच्या लेखणाचा थाक सत्ताधा-यांना वाटणे गरजेचे असते. त्याच्या मनात समाजाविषयी कणव असणे गरजेचे आहे. साहित्यिकाने प्रसिध्दीच्या पाठी न लागता समाज...