Posts

Showing posts from August, 2023
Image
  " नको तुलना एकमेकांच्या मुलांची सुंदर बाग दिसते वेगवेगळ्या फुलांची" या लेखातील शीर्षकाच्या ओळी लहान मुलांच्या बाबतीत लिहल्या असल्या तरी त्या आपल्या सर्वांना लागू होतात . प्रत्येक मुलं जस वेगवेगळे आहे आणि जेव्हा पालक आपल्या मुलांची इतर मुलांबरोबर तुलना करत असतात तेव्हा ते आपल्या  मुलांवर नकळत अन्याय करत असतात. आपण देखील आपली तुलना इतरांसोबत करतो तेव्हा आपणही स्वतःवर अन्यायच करत असतो.  प्रत्येक व्यक्ती हा निराळा आहे. त्याचे जीवनातील प्राधान्यनक्रम वेगळे आहेत. त्याला मिळालेली परिस्थिती वेगळी आहे. प्रत्येकाचे स्वभाव वेगळे आहेत. सुख दुःखाच्या कल्पना वेगळया आहेत. तेव्हा एकमेकांची तुलना करून कसे चालेल. आणि जरी केली तरी ती माझ्या मते न्याय ठरेल असेही  नाही. तेव्हा तुलनेचा विचार हा व्यर्थ आहे.  अगदी तुलना करावयाचीच असेल तर स्वतः ची स्वतःचीच करा. आपल्या आत्तापर्यंतच्या जगलेल्या आयुष्याचे सिंहावलोकन करा. नक्कीच तुम्हाला बदल जाणवलेला दिसेल. अगोदर तुम्ही कोणावर तरी अवलंबून होतात आज कोणीतरी तुमच्यावर अवलंबून असेल. आपल्या जाणीवा आधीपेक्षा अधिक सजग झालेल्या असतील. वागण्या बोल...
Image
                                                                                             "जीवनाचा प्रत्येक टप्पा आनंददायी" बालपण, तरुणपण, प्रौढपण, म्हातारपण हे जीवनाचे मुख्य चार टप्पे. तसं पाहीलंतर जीवनातील या चारही टप्प्याची गोडी काही औरच आहे. फक्त बालपणाचाच काळ सुखाचा असे म्हणणे काहीसे चुकीचे वाटते. अर्थात बालपणात काही जबादारी नसल्यामुळे, सर्व बाजूने लाड व काळजी घेत जाण्यामुळे हा काळ सुखाचा नक्कीच वाटू शकतो त्याच्या गोड आठवणी प्रत्येकाच्या ह्रदयात कायम वास्तव्यास असतात. या काळात केलेली दंगामस्ती, विविध खेळ, पहिली शाळा , पहिला गणवेश, विविध स्पर्धेत घेतलेला भाग, मिळवलेली बक्षिसे , सहली सारेच काही मजेशीर.  जीवनातील दुसरा टप्पा म्हणजे तरुणपण. प्रचंड उत्साहाचा, ऊर्जेचा काळ. स्वतःबरोबर दुसऱ्याच्याही प्रेमात पडण्याचा काळ. नवी नवी स्वप्न पाहण्याचा काळ. ...