Posts

Showing posts from April, 2023
Image
                                                              मनाचा दसरा  कधी काढलाय ?  नवरात्र , दसरा जवळ येतोय .  घरोघरी या निमित्ताने साफसफाई जोरात चालू आहे.   वर्षभर घरात सासलेली घाण , जळमटे ,  टाकाऊ सामान आपण या वेळी बाहेर टाकतो . याने होत काय तर घर स्वच्छ व सुंदर दिसतं .  नवीन एखादी वस्तू घेतली जी या व पुढे येणाऱ्या  दिवाळी  सणा निमित्त घेतली देखील जाते तिला निरुपयोगी वस्तू बाहेर गेल्याने मुबलक जागा मिळते . घर मोकळा श्वास घेतं. हे आपण सर्व दरवर्षी नियमीत करतो. हे झालं घराचं पण मनाचे काय ? कधी आपण ते स्वच्छ  केलंय ?  कधी त्यात साठलेली जळमटं आपण काढलीत ? कधी त्यात नीटसं डोकावून पाहिलंय ?  याचे  उत्तर नाही असंच असेल .  स्वच्छ घरात बुरसट , राग, व्देष, ईर्षा,  विषारी स्पर्धा युक्त मनाची माणसे आनंदी कशी राहू शकतील. मागील एखाद्या वाईट घट...
Image
  आत्मस्तुती म्हणजे आत्महत्या  महाभारतातील एक कथा आहे कौरव पांडवांचे युद्ध हे अंतिम टप्प्यात आले होते  गुरु द्रोण युद्धात मारले गेले  तर  पितामह भीष्म अर्जुनाच्या बाणाने शरपंजरी पडलेले असतात. कर्ण हा आता कौरवांचा प्रधान  सरसेनापती झालेला असतो. अनेक प्रयत्न करूनही कर्णाला हरविणे हे पांडवाना शक्य होत नसते . त्यामुळे पांडवांच्या गोटात निराशेचे वातावरण पसरलेले असते . अशा   प्रसंगी संयमी असलेले धर्मराज अर्जुनाला संतापाने म्हणतात "तू तर स्वतःला सर्वश्रेष्ठ धनुर्धारी समजतो तरीही तू कर्णाला हरवू शकत नाहीस ? काय कामाचे तुझे  हे गांडीव  धनुष्य ? कर्णाचा जोपर्यंत आपण पाडाव करत नाहीत तोपर्यंत हे युद्ध आपण जिंकू शकत नाहीत  हे तुला  चांगले माहित माहित आहे    " हे मोठ्या भावाचे बोल ऐकून अर्जुन दुःखी होतो. त्याचा एक प्रण असतो 'जो कोणी माझ्या गांडीव धनुष्याचा अपमान करेल त्याचा मी वध करेन' . आता तर मोठ्या  भावाकडूनच अपमान झालेला आहे व प्रण पूर्ण करायचा असेल तर भावाचा वध करणे क्रमप्राप्त आहे. यावर श्रीकृष्ण एक तोडगा काढतात. ते अर्ज...
Image
जीवनशास्त्र कोण शिकविणार?        एका मोठया  उदयॊगपतीची नैराश्यातून आत्महत्या. शिकाऊ महिला डॉक्टरची वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून  आत्महत्या. मोबाईल गेमच्या व्यसनामुळे तरुणाची  आत्महत्या. प्रेमप्रकरणातून तरुण किंवा तरुणीची आत्महत्या. परीक्षेच्या अपयशामुळे विद्यार्थ्याची  आत्महत्या अशा  बातम्या वाचल्या कि मन सुन्न होते. केवढी हि निराशा?  केवढा अघोर  पलायनवाद ?  केवढा हा काळोख ?  कोठे चाललोत  आपण? कुटुंबव्यवस्था,  शिक्षणव्यवस्था, समाजव्यवस्था नापास तर ठरत नाही ना?. या सर्वांची नेमकी जबाबदारी  कोणाची? हे वाढत चाललेले आत्महत्येचे प्रकार आपण थोपवू शकणार आहोत कि नाही? याचे उत्तर आपल्याला शोधावे लागेल .  आपण शिक्षणव्यवस्थेत मोठी क्रांती केली. रोज असंख्य विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करून नोकरी,व्यवसाय करण्यासाठी समाजात दाखल होतात. ते नॊकरी,व्यवसाय  करण्यासाठी एखाद्यावेळेस पात्र असतील पण जीवनाच्या लढाई साठी ते पात्र आहेत का, हे कोण तपासणार? ते जर पा...