नियोजनाचे महत्व समजून घेऊया एका प्रसिद्ध विनोदी लेखकाचे एक वाक्य आहे "ऐन वेळेस होण्यासारखी एकच गोष्ट ती म्हणजे फजिती". या वाक्यातून नियोजनाचे महत्व अधोरेखीत होते. नियोजन नसेल तर तारांबळ, फजिती, कामात चुका , ताणतणाव अशा गोष्टींना सामोरे जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही. विद्यार्थी लोकांना अभ्यासाचे नियोजन करावे लागेल . गृहिणीला आपल्या घरातील दैनंदिन कामाचे नियोजन करावे लागेल. नोकरदाराला आपल्या नोकरीतील कामाचे नियोजन करावे लागेल तर व्यावसायिकाला आपल्या व्यवसायातील कामाचे. म्हणजे सर्वत्र नियोजन आवश्यकच आहे. जेवढे काटेकोर तुम्ही बारीक बारीक गोष्टींचे नियोजन कराल तेवढी कामे यशस्वी होतील. आपण दिवसाचे, आठवड्याचे, महिन्याचे, वर्षाचे, पुढील पाच वर्षाचे नियोजन करू शकतो. पण नुसते कागदावर नियोजन करून भागणार नाही तर त्या नियोजनाची अंमलबजावणी देखील तेवढीच काळजी...