गुणांची उजळणी करूया एक व्यक्ती अनेकांशी जोडला गेलेला असतो. मित्र, नातेवाईक, शेजारी, सहकारी अश्या वेगवेगळ्या नात्यात तो गुंफलेला असतो. यांच्याशीच रोजचे व्यवहार तो करत असतो. त्याच्या संबंधित कोणताच माणूस हा परिपूर्ण नसतो. त्यात काही अवगुण असतातच. एक व्यक्ती म्हणून आपण दुसऱ्यांच्या अवगुणावर सहज बोट ठेवतो . 'हा रागीटच आहे' . 'तो गर्वीष्ठच आहे'. 'तमका गबाळाच'. 'हा सतत चेष्टाच करतो' अशी अनेक नावे आपण ठेवत असतो. प्रत्येक माणूस हा परिपूर्ण नाही हे खरे असले तरी त्यात आपल्याला घेण्यासारखा एकही गुण नाही असे कधीच होत नाही. पण आपण अवगुणांची बाराखडी वाचण्यात एवढे तल्लीन झालेले असतो की त्या व्यक्तींमध्ये असलेल्या गुणांची दखल आपण घेतसुद्धा नाही , मग ते गुण आपल्यात उतरविणे तर दूरचीच गोष्ट . एखादा व्यक्ती गर्वीष्ठ असेल तर तोच व्यक्ती टापटीप असेल, कर्तव्यात चोख असेल. एखादा व्यक्ती गबाळा अ...